Friday, 13 April 2018

Anita

कितीही रागवला
 तरी मायेन तोच जवळ घेतो…
कधी रागाने बाहेर गेला तरी त्याचे पाय आपोआप घराकडे वळतात ..
मनातले भाव त्याला डोळ्यातूनच कळतात ..
किती दुःखी असला तरी सारं गिळून घेतो. कोण आहे तिला आपल्या शिवाय म्हणून तिच्यासाठी रडतो …
नवरा तो नवराच असतो….
 .
काळजी का करतेस ? मी आहे न तुला.
म्हणून किती धीर देतो.
 सा-या अडचणी आपल्या मनात ठेऊन बायकोकडे
 हास-या नजरेन पाहतो…मायेने तिला जवळ घेतो..
नवरा तो नवराच असतो....

जसं घरावर छत असतं, तसंच आपल्या डोक्यावर नव-याचं झाकण असतं.
 किती सुरक्षित असतो आपण त्यांच्या
 सावलीत …
ऊन्हाचे चटके तो खातो,
 पण सावली आपल्या डोक्यावर देतो..
नवरा तो नवराच असतो….
 .
आपण चार अलंकार घालून म्हणतो
 "मान माझी मंगळसुत्र तुझं,
 कपाळ माझं बिंदी तुझ्या नावाची .."

 तो कधी म्हणतो का ?
"कष्ट माझे पगार तुझा…
शरीर माझं आयुष्य तुझं …..
जन्म आईच्या उदरात,
पडलो तुझ्या पदरात ..
तू जीवन संगिनी म्हणून गोड मानत असतो ….
नवरा शेवटी नवराच असतो…

बायकोशिवाय घराला घरपण नाही, तसंच नव-याशिवाय बायको पूर्ण नाही.
तो कळस आहे घराचा,
छत आहे परिवाराचा…
चटके तो खातो आपण मात्र सावलीत राहतो
 नवरा तो नवराच असतो ..
 .
आयुष्यातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील पण नव-याची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही…..

म्हणून एकमेकांना मायेची हाक द्या,
 प्रेमाची साथ द्या. जीवन क्षणभंगूर आहे जगण्याचा आनंद घ्या….
खूप नशीबवान आहे मी..न आभारीही......
 .